पुणे १८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबईवरून राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते झाले आक्रमक, दरम्यान आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली आहे, महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये १ली पासून तिसऱ्या भाषेच्या माध्यमातून हिंदी भाषेची सक्ती करु पाहणा-या महायुतीच्या सरकारवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाम पणे विरोध केला आहे, महायुती सरकारने हे धोरण बदलले नाही तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जबाबदार राहणार नाही,असा इशारा दिला होता, दरम्यान ठाकरे यांची पत्रकार परिषद संपन्न होताच यांचे आता पडसाद मुंबईसह अनेक ठिकाणी उमटताना दिसत आहे,
दरम्यान राज ठाकरे यांची पत्रकार परिषद संपताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत हिंदी भाषेच्या पुस्तकांची होळी करण्यात आली आहे, दरम्यान कार्यकर्ते यांनी हिंदी भाषेच्या पुस्तकांची पाने फाडून ते जाळुन टाकले आहे, दरम्यान आता हे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच राज्यातील शाळा नुकत्याच दोन दिवसांपूर्वी सुरू झाल्या आहेत, त्यामुळे आता महाराष्ट्रा मधील सर्व शाळांमध्ये हिंदी विषय शिकवला जाणार का ? हे बघावे लागणार आहे, दरम्यान राज ठाकरे यांनी शाळांमध्ये हिंदी भाषा कशी शिकवतात हे आम्ही बघू असा इशाराच दिला आहे, आता यावरुन महायुती सरकारची यावर नेमकी काय भूमिका आहे,हे पहावे लागणार आहे, तसेच हिंदी भाषेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे, तसेच पोलिसांनी 👮 कारवाई केल्यास हे आंदोलन आणखीच सर्व महाराष्ट्रात भडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता महायुती सरकार हा हिंदी भाषेचा प्रश्न कसा हातळणार हे पाहावे लागेल, पण आज मात्र या प्रकरणी मुंबईत पहिली ठिणगी पडलेली आहे,