पुणे १८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज बुधवारी दुपारी जगद्गुरू संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांची पालखी आषाढी वारी साठी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे, दरम्यान संत तुकाराम महाराजांचा यंदाचा ३४० वा हा पालखी सोहळा आहे, दरम्यान महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी देहू मध्ये दाखल होत आहेत, सोहळा याचि देहा,याचि डोळा पाहण्यासाठी आतुर झाला आहे, तर मुख्य मंदिरात सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे, दरम्यान दुपारी आज पालखी निघणार आहे,या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत,
दरम्यान इंद्रायणी नदीच्या काठावर वारकरी यांनी मोठ्या प्रमाणावर राहुट्या उभारल्या आहेत,तर सर्व धर्मशाळा मध्ये नामसंकीर्तन चालू आहे , दरम्यान रथाला चांदीची चकाकी देण्यात आली आहे, तसेच पालखीला मखमली कपड्याचा साज दिला आहे, तसेच रंगीबेरंगी फुलांच्या माळा सज्ज आहेत, तसेच यावर्षी प्रथमच देहू संस्थानच्या वतीने पालखीचा रथ ओढण्यासाठी संस्थानची नवीन बैलजोडी हा रथाला ओढणार आहे, राज्या मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे बळीराजा सुखावला आहे, अतिक्रमणे हाटवून मुख्य रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे, तसेच भाविकांची मोठी संख्या गृहात धरून नगर परिषद आणि प्रशासनाने तयारी पूर्ण करण्या वर लक्ष केंद्रित केले आहे,