Home Breaking News आज सकाळपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू, पावसाने वारकऱ्यांची तारांबळ उडाली पुढील १२...

आज सकाळपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू, पावसाने वारकऱ्यांची तारांबळ उडाली पुढील १२ तास असाच मुसळधार पाऊस कोसळणार

131
0

पुणे १९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात आज गुरुवारी सकाळपासून पुणे शहरात व उपनगरात पाऊस कोसळत आहे, पुण्यात हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे, तसेच पुढील १२ तास पुणे येथे पाऊस कायम राहणार आहे, दरम्यान सकाळी कामधंद्याला जाणाऱ्या पुणेकर नागरिकांची पावसाने दाणादाण उडविली आहे.तर काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे, पावसाचा दुचाकी वाहन चालकांना देखील फटका बसला आहे,

दरम्यान पुणे व मुंबई या भागात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार ते अतिमुसाळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे, तसेच पुण्यात घाटमाथ्यावर व सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे,तरी नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी,असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे, दरम्यान जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने देहू मधून पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे,तर आज गुरुवारी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान दुपारी पंढरपूरकडे होणार आहे, अनेक वारकरी हे महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून देहू व आळंदी येथे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत, या वारकऱ्यांची देखील पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे,

Previous articleशिवसेनेचे आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिन
Next articleआळंदीत इंद्रायणी नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या वारकऱ्याला,NDRF च्या पथकाने वाचवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here