पुणे १९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही आळंदी येथून आली आहे, आळंदी येथील इंद्रायणी नदीच्यावर असलेला भक्ती सोपान पुलावरील लोखंडी रेलिंग तुटले आहे, त्यामुळे हा पूल वारकऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे, दरम्यान आषाढी एकादशी निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूर कडे प्रस्थान होणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आळंदीत महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी हे आळंदीत दाखल झाले आहेत, दरम्यान आळंदीत मुसाळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पात्रात जाण्यासाठी वारकऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे,