पुणे २० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, त्यामुळे अनेक पर्यटक ते धबधबा पाहण्यासाठी व निसर्गच्या सानिध्यात फिरावयास जातात , दरम्यान पुणे जिल्ह्यातील मावळ येथे दुर्घटना होऊन पूल कोसळून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे,याच पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे,१९ ऑगस्टपर्यंत पर्यटनस्थळावर निर्बंध घातले आहेत,
धबधब्यावर जाणे, तसेच पाण्याच्या प्रवाहात खाली बसणे, तसेच खोल पाण्यात उतरणे,व पोहणे 🏊,यावर आता बंदी घालण्यात आली आहे, यासारखे निर्बंध लागू करण्यात आले आहेत,द-यांचे कठडे, धोकादायक वळण,या सारख्या ठिकाणी सेल्फी आणि चित्रीकरण करण्यास बंदी घातली आहे, तसेच धबधबा परिसरात मद्यपान करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे, तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवता येणार नाही, तसेच सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे,