पुणे २१ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातूनच एक खळबळ जनक अपडेट आली आहे, महाराष्ट्रातील अनेक वारकरी हे मोठ्या संख्येने व भक्ती भावाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले आहेत, दरम्यान याचवेळी पुण्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला आहे, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्या वर्तणुकीमुळे हा वाद निर्माण झाला आहे, त्यांनी वारकरी व मीडीया प्रतिनिधी आणि पोलिसांशी अरेरावी केली,असा आरोप केला जात आहे, दरम्यान गैरवर्तन झाल्यांने वारकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे,
दरम्यान आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी थेट वारकरी, पोलिस व मीडीया प्रतिनिधींशी गैरवर्तन केले,यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे,अशा घटना पुन्हा घडणार नाही याची काळजी घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे,व सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, तसेच विकास आराखड्यात आळंदीत एक आरक्षण कत्तल खाना सुरू करण्यासाठी दाखवले आहे,पण कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना सुरू होऊ दिला जाणार नाही,असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे,