पुणे २१ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही रेल्वे अपघातासंदर्भात आली आहे, बिहार येथील कटिहार येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे,अवध असाम एक्स्प्रेसने व रेल्वे ट्राॅलीला जोरात धडक झाली आहे,यात रेल्वे ट्राॅलीतील ३ ते ४ रेल्वे कर्मचारी गंभीर रित्या जखमी झाले असून यातील ट्राॅलीमॅनचा जागीच मृत्यू झाला आहे, दरम्यान या प्रकरणी रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बिहार येथील कटिहार -बरौनी रेल्वे मार्गावर डाऊन लाईनवर बरौनीहून कटिहारकडे जाणारी अवध-आसाम एक्स्प्रेस काढागोला व सेमापूर दरम्यान एका रेल्वेच्या ट्राॅलीला धडकली, या धडकेत रेल्वे ट्राॅलीचे तुकडे तुकडे झाले, रेल्वेने या अपघाता बाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, आहेत तर जखमी झालेल्या रेल्वे कर्मचारी यांना तातडीने उपचारा साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,