पुणे २३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पंढरपूरातून आली आहे, पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत बुडणाऱ्या ६ वारकऱ्यांना वाचवण्यात कोळी बांधवांना यश आले आहे, दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारी साठी पंढरपूर येथे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणा वर गर्दी झाली आहे, दरम्यान दर्शना पूर्वी ६ वारकरी हे चंद्रभागा नदीत आंघोळीसाठी गेले होते,पण त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले होते,पण यावेळी नदीत असणाऱ्या कोळी बांधवांनी या वारकऱ्यांना नदीत बुडताना वाचवण्यात यश आले आहे, यातील ६ वारकऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे, दरम्यान उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने नदीच्या पातळीत वाढ झाली आहे,