पुणे २६ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली आहे, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे,सदरचे अधिवेशन हे ३० जून ते १८ जुलै असे चालणार आहे, तसेच २९ जून रोजी प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधक हजेरी लावणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, दरम्यान या अधिवेशन मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, तसेच हिंदी भाषेचा मुद्दा, तसेच शक्तीपीठ महामार्ग या सर्व मुद्यांवरून विरोधक हे महायुती सरकारला घेरण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजणार आहे,