पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली आहे, महायुती सरकारच्या हिंदी भाषा सक्तीवरुन उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे,”जेव्हा मनसे प्रमुख ताज एन्डसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटतात तेव्हा भारतीय जनता पार्टीवाल्यांना ते चांगले वाटतात,पण याच मनसे प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोर्चा काढण्याची भाषा केली तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विपरित विधाने सुचायला लागतात, दरम्यान या मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना व मनसे या दोन पक्षांचे मनोमिलन भारतीय जनता पार्टीला रुचले नाही, यामुळे भारतीय जनता पार्टीचे पित्त खवळले आहे,” असं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे,