पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबई वरुन एक खळबळ जनक अपडेट ही राजकीय वर्तुळातून आली आहे, दरम्यान महायुती सरकारने महाराष्ट्रात हिंदी भाषाची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता,तसेच तसा GR पण काढला होता याला महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणावर सर्वच राजकीय पक्षांनी व मराठी माणसाच्या वतीने प्रचंड असा विरोध करण्यात आला व आज सरकारच्या GR ची होळी करण्यात आली आहे, दरम्यान आज यावर कॅबिनेट मंत्री मंडळा मध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे,
दरम्यान तिसरी भाषा कितवी पासून शिकवावी व मुलांना कोणता पर्याय द्यावा,यावर आजच्या कॅबिनेट मध्ये चर्चा करण्यात आली आहे,अशी माहिती थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे, तसेच यावर आता राज्य सरकारच्या वतीने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.नरेंद्र जाधव हे असणार आहेत, दरम्यान या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषे संदर्भात निर्णय घेण्यात येईल, त्यामुळे १६ एप्रिल व १७ जूनचा महायुती सरकारचा शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे,