पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाचे ठाणे जिल्ह्यातील नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यात एका प्रचारसभेत बोलताना त्यांची जिभ चांगलीच घसारली आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले की.चिन्ह आणि अजित पवार यांच्या बद्दल बोलताना जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.अजित पवार गट म्हणजे पाकिट मारांची टोळी आहे.अजित पवार हे मर्द असते तर दुसरे चिन्ह घेऊन विधानसभेला लढले असते.असे गंभीर वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केले आहे.त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच भर थंडीत आता राज्यातील राजकारण हे तापायला सुरुवात झाली आहे.दरम्यान आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.