पुणे दिनांक १७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक अपडेट हाती आली असून.परभणीत पोलिस कस्टडी मध्ये मृत्यू झालेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्येकर्ता सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आरोपींवर महायुती सरकारच्या वतीने अद्याप कोणतीही प्रकारची कारवाई न झाल्याने आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणावर नाराज झाले असून.आज दुपारी १ वाजता परभणी ते मुंबई असा लाॅंग मार्च निघणार आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी परभणीत झालेल्या आंदोलनादरम्यान सोमनाथ सुर्यवंशी याला परभणी पोलिसांनी 👮 ताब्यात घेतले होते.दरम्यान पोलिस कस्टडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता.असा दावा आंबेडकर अनुयायी यांनी केला होता.तर याबाबत महायुती सरकारने मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला पण सोमनाथ याच्या कुटूंबायांनी सदरची मदत नाकारली होती.व यात दोषी असणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबायांनी महायुती सरकारकडे केली आहे.