पुणे ७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भारतीय लष्करा च्या वतीने पाकिस्तान मध्ये असलेल्या एकूण ९ दहशतवादी तळावर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करुन १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले आहे. आज हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. कारण भारतीयांशी पंगा घेतल्यानंतर काय होते.हे आज भारतीय लष्कराच्या वतीने दाखवून देण्यात आले आहे. दरम्यान या बाबतची संपूर्ण माहिती देण्या साठी भारतीय लष्कराची आज सकाळी १०.३० वाजता पत्रकार परिषद होणार आहे.या लष्कराच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागले आहे.