पुणे १० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत -पाकिस्तान यांच्यात सीमेवर संघर्ष सुरू आहे. दरम्यान पाकिस्तानकडून वारंवार खोटे बोलण्याची मालिकाच सुरू केली आहे.व चुकीचे संदेश पसरवत आहे.त्याबाबत आज परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्कराच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यावेळी अनेक खुलासे केले आहेत.पाकिस्तानच्या वतीने सांगण्यात येत आहे की.आम्ही भारताचे एअरबेस उद्धवस्त केले.असा दावा केला आहे.पण हे चुकीचे वृत्त आहे.भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित आहेत.असे सांगितले आहे.
पाकिस्तानने मध्यरात्रीच्या सुमारास भारतावर मिसाईल डागले आहे.सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार हल्ले सुरूच आहे.नागरी विमानांना ढाल बनवून पाकिस्तानकडून हल्ला सुरू आहे.पाकिस्तान कडून खोट्या बातम्या पसरवण्याचा उद्योग सुरू आहे.तसेच पाकिस्तानकडून ड्रोन आणि फायटर विमानांचा वापर केला जात आहे.भारतीय लष्कराच्या वतीने पाकिस्तान सैन्याचे मोठे नुकसान केले आहे.याच बरोबर पाकिस्तानकडून हायस्पीड मिसाईलचा वापर केला जात आहे.तसेच भारतीय लष्कराच्या वतीने पाकिस्तानच्या सियालकोट एअरबेसवर हल्ला केला आहे.पाकिस्तानी हल्ल्याला परतवून लावण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या अनेक भागात हल्ले केले आहेत.यामध्ये नीलम व्हॅली, सियालकोट, पाकिस्तानचे गुजरात,जलालपूर,जाटान कॅंट,ओकरा ,यासह अनेक परिसराचा यात समावेश आहे.तर अनेक जिल्ह्यांत ड्रोन दिसून आले आहेत. दरम्यान गुरुवारी व शुक्रवारी पाकिस्तानने जवळपास ४०० ड्रोनने भारतावर हल्ला केला होता.हा हल्ला भारतीय लष्कराच्या वतीने हाणून पाडण्यात आला आहे.तसेच भारतीय लष्कराच्या वतीने आज पहाटे पाकिस्तानचे तीन एअरबेस उडवल्याचे देखील वृत्त आहे.पाकिस्तानी सेनेच्या वतीने हा दावा करण्यात आला आहे.दरम्यान भारतीय लष्कराच्या बॅलेस्टिक मिसाईलने पाकिस्तानच्या ३ एअरबेसला टार्गेट केले आहे.रात्रभर भारतीय लष्कराच्या वतीने एकूण ६ बॅलेस्टिक मिसाईल डागले, रावळपिंडीतील नूर खान एअरबेस शोरकोट येथील रफीकी वायुसेनाचा तळ आणि मुरीद एअरफोर्स बेस यांना निशाणा बनवण्यात आले आहे.