पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियम दुर्घटनेनंतर कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी,के. शिवकुमार आज गुरुवारी मीडियासोबत बोलताना भावूक झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते,ही दुर्घटना आमच्याच घरात झाल्याचे वाटत आहे, जेव्हा मी कार्यक्रमस्थळी होतो, त्यावेळी मला दुर्घटना संदर्भात माहिती मिळाली , दरम्यान पीडीतांना पाहून मी माझे अश्रू थांबवू शकत नाही,असे शिवकुमार यांनी म्हटले आहे, तसेच आरसीबीच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेल्या ११ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे,तर एकूण ३३ जण गंभीर असून त्यातील काहीजण मृत्यूशी झुंज देत आहे,