पुणे १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात सर्वात मोठी जीवितहानी झाली आहे,कारण यात मृतांचा आकडा वाढला आहे,विमानात प्रवास करणाऱ्या २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तसेच हे विमान ज्या मेडिकल कॉलेजवर पडले, तेथील २४ जणांचा मृत्यू झाला आहे,अशी मृतांची संख्या २६५ झाली आहे, अक्षरशः मृतदेह पूर्ण जळाले आहेत, त्यांची ओळख पटविण्यासाठी आता DNA चाचणी करण्याचे काम सुरू झाले आहे.त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे,
दरम्यान एअर इंडियाचे विमान कोसळून २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे,शिवाय हे विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळल्याने तेथील २४ जणांचा मृत्यू झाला आहे, आता टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्याकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे,ते बी .जे.मेडीकल काॅलेजची इमारतही टाटा ग्रुप बांधून देणार आहे, तसेच टाटा ग्रुपने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्याची घोषणाही केली आहे,