पुणे १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच दिव्यांगा च्या प्रश्नावरून प्रहार करून अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू हे अमरावतीत उपोषणाला बसले आहेत.आज त्यांचा उपोषणाचा ६ वा दिवस आहे,आज अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी जावून बच्चू कडू यांची भेट घेतली, व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून कडू यांचे बोलणं करुन दिले, यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात तातडीने सरकारच्या वतीने समिती तयार केली जाईल.असे आश्र्वासन दिले, तसेच इतर मागण्यांसंदर्भात संबंधित मंत्र्यांबरोबर चर्चा करून येत्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांच्या बरोबर चर्चा करुन निर्णय घेऊ असे सांगितले, दरम्यान कडू हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत,