पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पुणे वाहतूक शाखेचे अधिकारी, पुणे महापालिकेच्या अधिकारी, तसेच मेट्रोचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांची एक बैठक घेतली, सदरच्या बैठकीत पवार यांनी खास करून पुणे मेट्रोचे अधिकारी यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे, पुणे शहर येथे एक आठवड्याच्या कालावधीत संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दाखल होण्यापूर्वीच मेट्रोंने पुणे शहरात अनेक ठिकाणी केलेला राडारोडा तातडीने काढून टाकावा, अन्यथा मेट्रोंवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,
दरम्यान पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की पुण्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे, तसेच कोरोना बाबत नागरिकांनी घाबरु नये, त्यांनी आज पुण्यातील आगामी पालखी सोहळ्याचा आढावा घेतला, तसेच पुणे शहर मधील राडारोडा मेट्रोंने पालख्यांचे आगमन होण्यापूर्वीच हटवावा अन्यथा मेट्रोंवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार,असे मेट्रो प्रशासनाला तंबी देण्यात आली आहे, तसेच मेट्रोच्या राडारोडा मुळे पुणे शहरातील वाहतूकीवर देखील परिणाम आहे, तसेच पालखी मार्ग दिवे घाट २१ मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे, तसेच मे व जून महिन्यात चांगला पाऊस झाला आहे,असे देखील पवार यांनी म्हटले आहे,