पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहर संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले,आमचे तोंड दाबण्याचे काम महायुती सरकार व पोलिस करत आहेत,अशी आक्रमक भावना या वेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत, दरम्यान निवडणुकीत या महायुतीच्या नेत्यांनी फक्त मतदानासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असं म्हटलं होतं, या महायुतीच्या सरकारने फक्त आतापर्यंत आश्र्वासनाच्या पलिकडे काहीच केले नाही, आता तोंडी आश्र्वासन नको तर शासकीय अध्यादेश पारित करण्यात यावा आता माघार नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करावी, तसेच शेतकऱ्यांना न्याय द्या,अशी मागणी या वेळी असा पवित्राच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे,