पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक खळबळजनक अपडेट ही वारकऱ्यांसंदर्भात आहे, मागच्या वर्षी विधान सभेच्या निवडणूका असल्याने तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडी साठी २० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती,पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत, दरम्यान एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी केलेली घोषणा विसरले, पण यंदा वारी सुरू झाली असतानाही अद्याप महायुती सरकारकडून कुठलीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे मागील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत्या म्हणून वारकऱ्यांना मदत दिली होती का ,असा परखड सवाल वारकरी करत आहेत,का लाडक्या बहीण योजनेचा फटका वारकऱ्यांना बसत असल्याची देखील चर्चा वारकरी संप्रदाय मध्ये आहे,