पुणे १४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबईतून आली आहे, मुंबईतील गोवंडी भागात एका भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तीन जणांना चिरडले, त्यामुळे या भीषण अशा अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.त्या नंतर या भागातील नागरिक चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला या मुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली, त्यानंतर या भागात 👮 पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी येथील संतप्त नागरिकांवर सौम्य लाठीचार्ज करुन जमावाला पांगवले आहे,