पुणे १८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज बुधवारी हिंदी भाषेवरून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शालेय अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा समाविष्ट केली आहे, यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत,आज पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला लिहिलेलं पत्र वाचून दाखवले ,व आम्ही हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात खपवून घेणार नाही,व हिंदीची सक्ती ही महाराष्ट्रातच का? दक्षिणेत ही भाषा सक्तीची कराल का ? असा सवाल देखील महायुती सरकारला केला आहे,
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की शाळा विद्यार्थ्यांना हिंदी भाषा कशी शिकवतात हेच आम्ही बघून,असा थेट इशाराच ठाकरे यांनी सरकारला दिला आहे, हे महायुतीचे सरकार मराठी साहित्य संपवून टाकतील ,व मराठीच्या सर्व गोष्टी संपवून टाकतील , केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल.माझ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना ही विनंती आहे की, या निर्णयाला जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे,असे आवाहन देखील त्यांनी केले आहे, दरम्यान आज भाषेची सक्ती करतात , उद्या इतरही फतवे काढले जातील, आम्ही हिंदू आहोत हिंदी नाहीत, महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिणार , तसेच हिंदी राष्ट्रभाषा नाही म्हणून सक्तीचा प्रश्न उद्भवत नाही, तसेच तिसरी भाषा अनिवार्य नाही,मग पुस्तक छापाई का सुरू केली ? सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी महायुती सरकारचे मनसुबे उधळून लावावेत, गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही,मग महाराष्ट्रात का लादता?, दरम्यान राज्य सरकारच्या हिंदीबाबतच्या नव्या जीआर मध्ये काय आहे? दरम्यान १ ली ते ५ वी साठी हिंदी सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल , तसेच हिंदी ऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर शिकता येईल,मात्र त्यासाठी किमान २० विद्यार्थी असणे आवश्यक आहे, तसेच २० विद्यार्थी झाल्यास शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल, अन्यथा ऑनलाइन शिकवली जाईल, तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य राहील,असा जीआर आहे,