पुणे १८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) देहू मध्ये आज संतक्षेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान सोहळा पार पडत आहे, यासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून वारकरी मोठ्या संख्येने देहू मध्ये दाखल झाले आहेत,असे असताना देहू मध्ये पोलिसांच्या या कृतीमुळे वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे, दरम्यान इतक्या वर्षां मध्ये कधीही एवढा वेळ दिंडी चालत नाही,मात्र या वर्षी ३ तास झाले,दिंडी मंदिरात गेली नाही, अशी नाराजी वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे,
दरम्यान यावेळी काही वारकऱ्यांना धक्का बुक्की करण्यात आली आहे,यात काही वारकऱ्यांना दुखापत देखील झाली आहे, तसेच पोलिसांनी 👮 दिंड्या रोखून धरल्यांने वारकरी संतापले आहेत, दरम्यान असं असून देखील आपल्या लाडक्या विठूरायाला भेटण्याच्या ओढीने जय हरी विठ्ठल असा विठू नामाचा जयघोष करत भक्तीमध्ये तल्लीन होत वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला बघायला मिळत आहे,