पुणे १९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही आळंदी येथून आली आहे, आषाढी वारी साठी आळंदीत आलेल्या एका वारकऱ्याला इंद्रायणी नदीच्या पुरात वाहून जात असताना NDRF च्या पथकाने तातडीने बचावकार्य करत सुरक्षित रित्या बाहेर काढले आहे, दरम्यान संबंधित वारकऱ्याचे नाव अमोल तुकाराम राठोड (वय ४० रा, यवतमाळ) असे आहे,
दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळाले ल्या माहितीनुसार आज गुरुवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी यवतमाळ येथून आळंदी येथे आलेले अमोल राठोड हे स्नाना करीता इंद्रायणी नदीत उतरले होते, दरम्यान आज झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे, दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने राठोड यांचा तोल गेल्याने आणि नदीच्या प्रवाहात ते वाहू लागले, यावेळी काही वारकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने NDRF , च्या पथकाने त्यांना तातडीने बाहेर काढले आहे, दरम्यान मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे,तरी वारकऱ्यांना स्नानासाठी नदीत उतरु नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे,