पुणे २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे, दरम्यान हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांचा ५ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे,मात्र दुसरीकडे महायुती सरकार हे हिंदी भाषा सक्ती वर ठाम आहे, दरम्यान महायुती सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी १ली आणि दुसरीला तिसऱ्या भाषेचं मौखिक शिक्षण दिले जाणार आहे, राज्यातील २० ते २५ % टक्के विद्यार्थी हे आधीपासूनच त्रिभाषेचे शिक्षण घेत आहेत,असे शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत, तर त्यांनी विरोधकांना टोल लगावला आहे,विरोधक हे जनतेची दिशाभूल करत आहेत,असे देखील भुसे यांनी म्हटले आहे,