पुणे २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पश्चिम महाराष्ट्रातून आली आहे, महायुती सरकारने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असताना देखील शक्तीपीठ महामार्गा च्या भूसंपादनाला मंजुरी दिली आहे, परंतु या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड असा विरोध आहे,यात प्रामुख्याने साखर पट्ट्यातील कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी व जमीन मालकांचा प्रचंड विरोध पाहायला मिळत आहे,आता शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना सांगलीत शेतकऱ्यांनी रोखले आहे, दरम्यान यापूर्वी कवठेमहांकाळमधील तिसंगीमध्येच शेतकऱ्यांनी अधिका-यांना रोखले होते, दरम्यान या महामार्गासाठी कोणत्याही परिस्थितीत मोजणी होवू देणार नाही,अशी आक्रमक भूमिकाच शेतकऱ्यांनी घेतली आहे,