Home Breaking News ५ जुलै मोर्चाची वेळच येऊ नये,आमचा प्रयत्न, आजच्या कॅबिनेटमध्ये मध्ये आम्ही चर्चा...

५ जुलै मोर्चाची वेळच येऊ नये,आमचा प्रयत्न, आजच्या कॅबिनेटमध्ये मध्ये आम्ही चर्चा करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

68
0

पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली आहे, हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे व शिवसेना ठाकरे बंधू ५ जुलै रोजी शनिवारी मोर्चा काढणार आहेत, दरम्यान त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे, हिंदीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे, हिंदीच्या मुद्द्यावरून मोर्चाची वेळच येऊ नये,असा आमच्या सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले आहेत, ते पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत,आज आम्ही संध्याकाळी आजच्या कॅबिनेट मध्ये त्यावर चर्चा करणार आहोत, त्यामुळे महायुती सरकार ठाकरे बंधूंच्या मोर्चा पूर्वीच हिंदी भाषा संबंधी काही निर्णय घेणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे,

Previous articleमुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा स्थगित
Next articleउत्तराखंडमध्ये उत्तरकाशीमध्ये भूस्खलन,९ जण बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here