Home सामाजिक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील रमेश खरमाळेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मनकी बात...

    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील रमेश खरमाळेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मनकी बात मधून सामाजिक कामांबाबत विशेष कौतुक

    147
    0

    पुणे ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातील जुन्नर तालुका येथील वनरक्षकाचे विशेष कौतुक, दरम्यान मन की बात १३३ व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” पुण्यातील रमेश खरमाळे  हे त्यांच्या कुटुंबीयांसह जुन्नरच्या डोंगरा 🗻 वर जाऊन 🌲 झाडे झुडपे लावत आहेत,ते पाणी वाचवणे साठी खंदक खोदून बियाणे पेरायाचे, फक्त दोन महिन्यांत त्यांनी ७० खंदक आणि असंख्य तळी निर्माण केली आहेत,ते ऑक्सिजन पार्क देखील तयार करत आहेत, परिणामी अनेक पक्षी 🐦 परत येत आहेत, वन्यजीव पुन्हा जिवंत होत आहे ” त्याचवेळी भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ मोहीमेचा उल्लेख केला आहे, तसेच शुभांशू शुक्ला यांचे देखील कौतुक केले आहे,

    दरम्यान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक आणि सध्याचे वनविभागात वन रक्षक म्हणून रुजू झालेले रमेश खरमाळे मागील अनेक वर्षांपासून जलसंवर्धन आणि वृक्षारोपणं काम करत आहेत,सन २०२१ साली त्यांनी दोन महिन्यात ४१२ मीटर लांबीच्या ७० जलशोक चरांची निर्मिती केली आहे, यामुळे पावसाळ्यात करोडो लीटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली आहे, त्यांच्या या कार्याचे अनेक स्तरांतून कौतुक होत असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, दरम्यान जुन्नर तालुक्यातील खोडद येथील रमेश खरमाळे हे लष्करात नौकरी करुन २०१२ साली सेवानिवृत्त झाले,त्यानंतर त्यांनी दोन वर्षे बॅंकेत नोकरी केली पण तिथं त्यांचं मन रमले नाही, पुढे जुन्नरला अॅकेडमी सुरू केली,या माध्यमातून अनेक मुले लष्करात भरती झाले,पण तिथे देखील मन न रमल्याने त्यांनी वनविभागाची परीक्षा देऊन वनरक्षक पदावर काम करण्यास सुरुवात केली,

    दरम्यान आपण निसर्गाच्या माध्यमातून कायम घेत आलो आहे,पण आपल्याकडे निसर्गाला देण्यासाठी काहीच नाही, आपण निसर्गाचे काही तरी देणे लागतो, या निस्वार्थी भावनेने त्यांनी पर्यावनासाठी व निसर्गासाठी काम करण्यास सुरुवात केली,२०२१ साली रमेश यांनी स्वताच्या वाढदिवशी पर्यावरणला एक भेट देण्यासाठी ठरवलं आणि जुन्नर शहराजवळ असलेल्या धामणखेल 🗻 डोंगरा वर जलशोषक चर खोदण्यास सुरुवात केली,व पुढील साधारण दोन महिन्यांमध्ये रमेश आणि त्यांच्या पत्नीने तब्बल ३०० तास काम करून ७० जलशोषक चरांची निर्मिती केली,या चरांची निर्मिती केली,या चरांची लांबी ही तब्बल ४१२ मीटर एवढी मोठी आहे, विशेष म्हणजे या जलशोषक चरांच्या माध्यमातून एकाच पावसामध्ये तब्बल ८ लाख लीटर वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली, पुढे याच डोंगरावर जवळपास साडेचारशे 🌲 झाडांची लागवड त्यांनी केली आहे, त्यांच्या या कार्याला पोलखोलनामा मराठी ऑनलाईन ई पेपरच्या वतीने विशेष कौतुकाची थाप

    Previous articleहिंदी भाषा सक्तीचा जीआर महायुती सरकारकडून रद्द ५ जुलैला होणार ‘विजय रॅली ‘, पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून वाटण्यात आले पेढे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here