पुणे दिनांक ५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई मधील मंत्र्यांचे बंगले आता खंडणीचे अड्डे बनले असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान आज पुण्यात बीड जिल्ह्यातील केज तालुका मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाती सर्व पक्षीय मुकमोर्चा पुण्यात होता या वेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी ‘ आवदा कंपनीचा व धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते वाल्मीक कराडचा बेकायदेशीर खंडणीचा व्यावाहार मुंबईती शासकीय बंगला सातपुडा येथे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झाला असा दावा करत चांगलीच पोलखोल केली.तसेच असे असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा.अशी मागणी केली आहे.