पुणे १६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही नाशिक येथून येत आहे.एआयद्वारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण नाशिक येथील शिबीरात दाखविण्यात आले आहे.दरम्यान आजच्या सद्यस्थिती परिस्थितीवर हे भाषण होते.”महाराष्ट्राला गुलाम बनवण्यासाठी व्यापा-यांनी शिवसेना तोडली . तसेच स्वताला निष्ठावंत म्हणारेच गद्दार निघाले.ते गद्दार दिल्ली पुढे मुजरा करतात.त्यांचे पाप धुतले जाणार नाही.गद्दारांनो तुमचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. माझा महाराष्ट्र या फितूरीचा बदला घेईल.मी अजूनही आहे”, असे बाळासाहेबांचे अभासी भाषण होते.