पुणे ९ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पाकिस्तान येथून आली आहे.जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान व्हाॅली मध्ये भारतीय पर्यटक यांच्यावर हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराने पाक येथील दहशतवादी तळावर ९ ठिकाणी हल्ला करून उध्वस्त केली आहे.त्यानंतर पाकिस्तानने भारतावर काल हल्ला केला आहे.यावर भारतीय लष्कराच्या वतीने पाकिस्तानवर हल्ला करून त्यांना चोख उत्तर दिले आहे.दरम्यान आता ए एन आयच्या वृत्तानुसार एक गुप्तचार अहवाल समोर आला आहे.त्यानुसार पाकिस्तानकडे फक्त ४ दिवसपूरेल एवढाच दारूगोळा शिल्लक असल्याचा पर्दाफाश केला आहे.दरम्यान अशा परिस्थितीत पाकिस्तान चार दिवसांमध्ये गुडघे टेकवण्याची शक्यता आहे.दरम्यान युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता पाकिस्तान कडील साठा मोठ्या प्रमाणात संपला आहे.